Happenings

घनिष्ठ मित्रांना सोबतच मृत्युने कवटाळले

गोलवाडी फाट्याजवळील अपघात

नेहमी सोबत असलेल्या मित्रांना मृत्युलाही विलग करणे शक्य झाले नाही. शिर्डीला एकत्र जाणाऱ्या पाच मित्रांचा भरधाव कार झाडावर आदळल्याने भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार झाडावर आदळली. शनिवार(दि. ३०) पहाटे दोन वाजे दरम्यान औरंगाबाद-नगर रस्त्यावर गोलवाडी फाट्याजवळ हा अपघात घडला. यात चार जण ठार तर दोन जण जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.
प्राप्त माहितीनुसार, चालक दत्ता डांगे, (३०), अक्षय शीलवंत (३०), आकाश मोरे (३०) आणि अमोर गव्हाळकर(२२) सर्व रा. शेवली, ता. जि. जालना अशी मृतांची नावे आहेत. संतोष राऊत (१७) आणि किरण गिरी (१६) हे जखमी झाले आहेत. जालना तालुक्यातील हे पाच महाविद्यालयातील तरूण शिर्डीला दर्शनासाठी भाड्याने गाडी करून गेले. चालकासह सहा जण कारमध्ये शेवलीतून शुक्रवारी रात्री नऊ वाजता शिर्डी कडे निघाले. जालन्याजवळ एका हॉटेलमध्ये त्यांनी जेवण केले आणि पुढे गेले. काही जण कारमध्येच झापले. औरंगाबाद ओलांडून गोलवाडी फाट्याजवळून जालना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या वडाच्या झाडावर आदळली. त्यात चालकासह तिघांचा जागीच तर एकाचा घाटी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळताच छावण पाेलिस स्टेशनचे संजय वामने, आर. डी. वडगावकर, पी. एस. अडसूळ आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अपघातग्रस्तांना घाटीत दाखल केले. सकाळी चार वाजेदरम्यान चालक दत्ता डांगे, आकाश मोरे, व अमोल गव्हाळकर यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर अक्षय शीलवंत याचा ट्रॉमा केअरमध्ये उपचारादरम्यान सकाळी साडेचार वाजता मृत्यु झाला. जखमी संतोष राऊत व किरण गिरी यांच्यावर उपचार सुरू आहेत. हृदयद्रावक अशा या घटनेने शेवली गावात हळहळ व्यक्त केली जात असून गाव शोकसागरात बुडाले आहे. औंरगाबादेतील छावणी पोलिस स्टेशनमध्ये या अपघाताप्रकरणी नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

Close