Breaking News

औरंगाबादेत मोटारसायकल चोरणारे नगरचे दोन अट्टल चाेरटे अटकेत

बेगमपूरा पोलिसांची कामगिरी

शहराच्या वेगवेगळ्या भागातून मोटरसायकल पळविणाऱ्या नगरच्या  दोन अट्टल चोरंाना बेगमपुरा पोलिसांनी अटक केली. दहा लाख रूपये किंतीच्या तब्बल दहा मोटरसायकली या चोरट्यांकडून जप्त केल्या आहेत. याविषयी बेगमपूरा पेालसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख शाहरूख शेख रहीम (२२, रा. किराडपुरा, मूळ रा. पिचपीरवाडी जि. अहमदनगर) आणि कृष्णा बाबासाहेब गुंड (२३, रा. आरणगाव,ता. जि. अहमदनगर), अशी चोरट्यांची नावे आहेत. असेफिया कॉलनीतील रहिवासी माेहम्मद कैसरोद्दीन नसिरोद्दीन सिद्दिकी (५२) यांची मोटरसायकल १८ नोव्हेंबर रोजी रात्री चोरीला गेली होती. याविषयी त्यांनी २० रोजी बेगमपूरा ठाण्यात तक्रार नोंदवली होती. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, सहायक आयुक्त हनुमंत भापकर, पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्ष प्रमोद देवकते, कर्मचारी शेख हैदर, रामधन उटाडे, शरद नजन, नामदेव सानप, नागेश पांडे, ज्ञानेश्वर ठाकूर यांच्या पथकाने तपास सुरू केला. तेव्हा ही मोटरसायकलची चोरी शेख शाहरूखने केल्याची माहिती खबऱ्याने पथकला दिली.
पोलिसांनी किराडपुरा येथील त्याच्या घरातून संशयित म्हणून शाहरूखला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि ठण्यात आणले. चौकशीदरम्यान सुरूवातीला त्याने उडवउडवीची उत्तरे दिली. पेालिसी खाक्या दाखवताच त्याने ताेंड उघडले. आणि साथीदार कृष्णाच्या मदतीने मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली. ही मोटरसायकल त्याने एका ठिकाणी लपवून ठेवल्याचे सांगितले. नंतर पोलिसांनी तक्रारदारांची मोटरसायकल जप्त केली. अधिक चौकशी अंती त्याने जिन्सी, सातारा, क्रांतीचौक आणि बेगमपुरा पेालिस ठाण्याच्या हद्दीतून बुलेट आणि २२० सीसी क्षमतेच्या नव्या पल्सर मोटरसायकल चाेरल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी कृष्णाला अटक करून आणले. दोघांची समोरासमोर चौकशी केल्यानंतर चोरलेल्या मोटरसायकल त्याने जालना, अहमदनगर, नेवासा आणि चाळीसगाव येथे विक्री केल्याचे सांगितले. पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन चोरीच्या मोटरसायकली खरेदी करणाऱ्यांकडून दुचाकी हस्तगत केल्या.

Related Articles

Close