Breaking News

तक्रारदारासच शहरातील वातावरण बिघडवत असल्याने अटक करावी- चंद्रकांत खैरे

शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे, चंद्रकांत खैरे व आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या विरोधात रत्नाकर भीमराव चौरे या व्यक्तीने बेगमपूरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. यावर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी खालील प्रमाणे प्रतिक्रीया दिल्याचे समजते आहे. खैरे म्हणाले की, शिवसेनेने फसवणूक केली म्हणत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, आमदार प्रदिप जैस्वाल व माझ्याविरोधात ठाण्यात देण्यात आलेली तक्रार म्हणजे केवळ मूर्खपणाचा कळस आहे. ज्याने कोणी ही तक्रार केली आहे त्यालाच शहरातील वातावरण बिघडवत असल्याने अटक करावी अशी मागणी आम्ही पोलिसांकडू करू अशा शब्दात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी बेगमपूरा पोलिस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीची खिल्ली उडवली.
तक्रारदाराने हिंदुत्वाच्या रक्षणासाठी मते मागितली, महायुती करून लढले आणि आता मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत सत्ता स्थापन करत आहेत. त्यामुळे आमचे मत वाया गेले असून फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी तक्ररीत केली आहे.

Related Articles

Close