Happenings

२१ वर्षांनंतर औरंगाबादहून विमान झेपावले उदयपूरकडे

उदयपूर विमानसेवेचे औरंगाबादहून उड्डाण

तब्बल २१ वर्षांनंतर आज बुधवारी दि. १६ पासून उदयपूर विमानसेवा सुरू झाली. सकाळी ७.१५ वाजता विमानाने उदयपूरकडे उड्डाण केले. एअर इंडिया मुंबई-औरंगाबाद-उदयपूर विमानसेवा करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी या विमानाने औरंगाबादहून अनेक प्रवासी उदयपूरला रवाना झाले. या विमानसेवेचे चिकलठाणा विमानतळावर वॉटर सॅल्युट देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे, उद्योजक सुनीत कोठारी, ऋषी बागला, गिरीधर संगनेरीया, मानसिंग पवार, जसवंत सिंह राजपूत, एअर इंडियाचे सेल्स अधिकारी संतोष नायर, स्टेशन मॅनेजर अरूण गलाटे आदी उपस्थित होते.

Related Articles

Close