Happenings

शहरत सीएए आणि एनआरसी विरोधात कृती समितीतर्फे सर्वपक्षीय मोर्चा

शहरात सीएए आणि एनअारसी विरोधात कृती समितीतर्फे सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारच्या दुपारच्या नमाजानंतर या माेर्चाला आमखास मैदानावरून सुरूवात झाली. दिल्ली गेटला मोर्चा आल्यावर त्याचे सभेत रूपांतर झाले त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थितांशी संवाद साधला.  सुधारित नागरिकत्व कायदा( सीएए) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदीच्या( एनआरसी) विरोधात न्यायालयात जाऊन काहीही उपयोग होणार नाही. तेथे आपणाला न्याय मिळणार नाही. न्यायालयही सरकारच्या तावडीत अडकले आहे. असे बहुवंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. India for Indians not for Religion, हमारी मांग समानता और न्याय, नफरत की राजनीति बंद करो अशा प्रकारचे फलक घेऊन मोर्च्यामध्ये हजारोंच्या संख्येने तरूण, महिला तसेच ज्येष्ठ नागरीक सहभागी झाल्याचे यावेळी दिसून आले. .

Related Articles

Close