Happenings

हम पेपर से नहीं, हम खून से हिंदुस्तानी है

नागरीकत्व कायद्याविरोधातील मोर्चा औरंगाबादेत शांततेत, इम्तियाज जलील यांनी मानले आभार

नागरीकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात देशात तीव्र आंदोलनं सुरू आहेत. औरंगाबादेत एमआयएमच्या पुढाकाराने विराट मोर्चाचे आयोजन करतण्यात अाले होते. हम पेपर से नहीं, हम खून से हिंदुस्तानी है, Ready to Die But Not Ready To Accept #CAB #NRC अशा प्रकारचे फलक घेऊन, हातात तिरंगा घेऊन या मोर्च्याद्वारे नागरीकत्व कायदा आणि एनआरसीला तीव्र विरोध दर्शवला गेला.

इम्तियाज जलील यांनी मानले आभार
इम्तियाज जलील यांनी या विराट मोर्चाकरता संपूर्ण यंत्रणा कामाला लावली होती. महाराष्ट्रातील सर्वात मोठा मोर्चा काढण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अपेक्षेपेपेक्षा जास्त जनता मोर्चात सहभागी झाली होती. परंतु कोणताही अनुचित प्रकार
माेर्चादरम्यान घडला नाही. लोकांनी दाखवलेला संयम आणि शांतता मार्गाने नोंदवलेल्या निषेधामुळे इम्तियाज जलील यांनी मोर्चेकऱ्यांचे आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे आभार मानले.

Related Articles

Close