Happenings
वाळूज मधील कंपन्यांच्या झालेल्या तोडफोडी च्या पार्श्वभूमीवर दोषींना अटक करण्याची उद्योजकांची मागणी.
गुरूवारी झालेल्या बंद च्या दरम्यान वाळुज परिसरातील ७० कंपन्यांमध्ये तोडफोड करण्यात आली या पार्श्वभूमीवर या परिसरातील सर्व उद्योजकांनी आज बैठक घेतली आणि दोषींना तात्काळ अटक करा अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली. यावेळी १५० उद्योजक उपस्थित होते.
जे काेणी या गुन्ह्यात सामील असतील त्यांना पुढे इंडस्ट्रीमध्ये नोक-याही मिळू नयेत तसेच पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत त्यातून चेहरे समोर येतीलच. यांपैकी कोणी इंडस्ट्री मध्ये कामाला असेल तर त्यांच्यावर अॅक्शन घेतली जाईल. तसेच जे काही घडले आहे ते अगदी प्लॅनिंगनुसार घडलेलं आहे. हे घडवून आणण्यासाठी कोणी तरी प्रयत्न केलेले आहेत. असा प्रयत्न परत होऊ नये या साठी सर्व संघटना मिळून एक अाराखडा तयार करून त्यावर काम करणार आहे.
– राम भोगले, उद्योजक
चेंबर अॉफ मराठवाडा इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर